महाराष्ट्रातील समाजसुधारक भाग - १

जगन्नाथ शंकरशेठ (इ.स. १८०३ ते १८६५)



·      जगन्नाथ शंकरशेठ यांचा जन्म १० फेब्रुवारी १८०३ रोजी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील मुरकुटे कुटुंबात झाला.

·      जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांना 'मुंबईचे शिल्पकार' म्हणून ओळखल जाते.

·      मराठी, इंग्रजी व संस्कृत भाषेत ते प्रगत होते.

·      श्रीमंतीचा व विद्ववत्तेचा वापर समाजसुधारणेसाठी केला.

·      इंग्रज अधिकारी वर्गामध्ये त्यांचा दबदबा होता.

·      एलफिन्स्टन यांच्या मदतीने त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी "स्थापन केली.

·      मुंबईत व मुंबई बाहेर अनेक शाळा सुरू केल्या.

·      स्टुडंट लिटररी अॅण्ड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेसाठी नानांनी फार मोठी आर्थिक मदत केली.

·      राहत्या घरी मुलींच्यासाठी शाळा सुरू केली.

·      एलफिन्स्टन कॉलेज सुरू केले.

·      बोर्ड ऑफ एज्युकेशन चे सदस्य. ( पुढे शिक्षण खात्यात रूपांतर).

·      मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेत मोलाचा सहभाग.

·      दादाभाई नौरोजी यांच्या समवेत 'बॉम्बे असोसिएशन' या संस्थेची स्थापना.

·      मुंबईच्या कायदेमंडळाचे सदस्य.

·      "नाना हे खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते" - आचार्य अत्रे.

·      ३१ जुलै १८६५ रोजी त्यांचा मृत्यू.

 

 

आचार्य बाळशास्त्री जांभेकर (इ.स. १८९२ ते १८४६)



·      आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म ६ जानेवारी १८१२ ला रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पोंबर्ले येथे झाला.

·      चाचपडणाऱ्या समाजाला परिवर्तनाच्या काळात व्यापाकदृष्टीने मार्ग दाखवण्याचे व समाज जागृतीचे काम केले.

·      संस्कृत, इंग्रजी, गुजराथी, बंगाली, फारसी आदी भाषांमध्ये त्यांनी प्राविण्य मिळवले होते.

·      बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये डेप्युटी सेक्रेटरी.

·      अक्कलकोट च्या युवराजाचे शिक्षक.

·      एल्फिन्स्टन कॉलेज मध्ये असिस्टंट प्रोफेसर.

·      शिक्षकांच्या अध्यापन वर्गाचे संचालक.

·      मुंबई इलाख्यातील प्राथमिक शाळा तपासणीसाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती.

·      इतिहास संशोधन, शिलालेख वाचन, ताम्रपटांचा शोध यांमध्ये निपुण.

·      इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित, छंदशास्त्र, नीतिशास्त्र इत्यादी विषयावर पुस्तके लिहिली.

·      शून्यलब्धी', 'हिंदुस्थानचा इतिहास', "हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास', 'सार संग्रह', 'इंग्लंडचा इतिहास' इ. ग्रंथ प्रसिद्ध.

·      ज्ञानेश्वरीचे पाठभेदासह संपादन केले.

·      १८३२ मध्ये 'दर्पण' हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू केले व 'दिग्दर्शन' हे मासिक सुरू केले.

·      आद्य सुधारक, मराठी वृत्तपत्राचे जनक, आद्य इतिहास संशोधक, सुधारणावाद्यांचे प्रवर्तक, शिक्षणतज्ज्ञ, श्रेष्ठ पत्रकार, एक प्रगमनशील व्यवहारवादी सुधारक म्हणून जांभेकरांचा सन्मान केला जातो.

·      १७ मे १८४६ रोजी बनेश्वर येथे मृत्यू.

 

 

दादोबा पांडुरंग तर्खडकर (इ. स. १८१४ ते १८८२)



·      दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म इ. स. ९ मे १८१४ रोजी मुंबईत झाला.

·      मराठी भाषेचे गाढे विद्वान, मराठी भाषेचे व्याकरणकार म्हणून ओळख.

·      मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून संबोधले जाते.

·      जावरा संस्थानच्या नवाबाचे शिक्षक म्हणून काम केले.

·      एलफिन्स्टन संस्थेत सुरतला शिक्षक म्हणून नियुक्ती.

·      १८१६ ला ट्रेनिंग कॉलेजच्या संचालकपदी नियुक्ती.

·      १८५२ मध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती.

·      भिल्लांच्या बंडाचा बीमोड त्यांनी कुशलतेने केला.

·      निवृत्तीनंतर बडोदा संस्थानात दुभाषी म्हणून काम केले.

·      सरकारने त्यांना 'रावबहादूर' ही पदवी दिली.

·      सामाजिक व धार्मिक सुधारणांचा पुरस्कार केला.

·      १८४४ मध्ये त्यांनी सुरत येथे दुर्गाराम मंछाराम, दिनमणी शंकर दलपतराय इत्यादींच्या सहकार्याने 'मानवधर्म सभा' स्थापन (कार्यकर्त्यां अभावी ही संस्था जास्त काळ टिकू शकली नाही).

·      ईश्वर एक आहे, मनुष्यमात्राची जात एक आहे, धर्म एक आहे, परमेश्वरप्राप्तीसाठी भक्ती करावी, सर्वांशी समानतेने वागावे इत्यादी उदात्त तत्त्वांचा पुरस्कार केला.

·      १८५९ मध्ये भिकोबा चव्हाण, राम बाळकृष्ण जयकर यांसारख्या मित्रांच्या मदतीने परमहंस सभेची स्थापना. (यातूनच पुढे प्रार्थना समाजाच्या स्थापनेला गती मिळाली).

·      आधुनिक ज्ञान व विज्ञानाशिवाय समाजाची प्रगती होणार नाही, हे समाजाला पटवून देण्याचे त्यांचे प्रयत्न अत्यंत मोलाचे मानले जातात.

·      १७ ऑक्टोबर १८८२ रोजी मृत्यू.

 

 

लोकहितवादी (इ.स. १८२३ ते १८९२)



·      लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म १८ फेब्रुवारी १८२३ रोजी पुणे येथे झाला.

·      महाराष्ट्रातील धर्मप्रबोधनाच्या क्षेत्रातील अग्रणी म्हणून लोकहितवादींची ओळख.

·      इंग्रजी. संस्कृत, फारसी, गुजराथी, हिंदी इ. भाषांमध्ये निपुण.

·      दुभाषी, शिरस्तेदार, मुन्सफ, इनाम कमिशनर, जज्ज आदी पदांवर त्यांनी काम केले.

·      सरकारने 'रावबहादूर' ही पदवी देऊन नावाजले.

·      भाऊ महाजन यांच्या प्रभाकर मध्ये त्यांनी हिंदू समाजाला उद्देशून 'शतपत्रे' लिहली.

·      लक्ष्मीज्ञान', ‘गीतातत्व’, ‘जातिभेद’, ‘भरतखंडपर्व', 'भिक्षुक', 'लंकेचा इतिहास', 'ऐतिहासिक गोष्टी', 'पानिपतची लढाई', 'कलियुग' आदी ग्रंथांचे लेखन.

·      समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, खुळ्या समजुती इत्यादींवर त्यांनी सडेतोड विचार मांडले.

·      बालविवाह, हुडा, बहुपत्नीत्व यावर त्यांनी हल्ला केला.

·      उच्चवर्णीयांनी आपल्या वर्ण श्रेष्ठत्वाचा त्याग करून समाजहितासाठी नवीन आचारविचाराचा स्वीकार करावा असा त्यांनी आग्रह धरला.

·      धार्मिक सुधारणेविषयीचे विचार अत्यंत चिंतनीय.

·      लोकांच्या निष्क्रियतेवर टीका करून कृतिशील बनले पाहिजे असा आग्रह धरला.

·      १९ व्या शतकाच्या भारतीय समाजव्यवस्थेतील दोष आणि वैगुण्य यांवर अचूक बोट ठेवले.

·      सर्वांगीण सुधारणेचे 'आयप्रवर्तक' म्हणून संबोधले जाते.

·      समाजाची प्रगती होण्यासाठी इंग्रजी विद्या, भौतिकशास्त्राचे ज्ञान, आधुनिक उद्योगधंदे यांचा त्यांनी आग्रह धरला.

·      समाजातील भेदभाव नष्ट झाले तरच समाज एकजिनसी बनेल आणि त्याच समाजात राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागेल असे त्यांचे मत होते.

·      काळानुसार धर्मात व चालीरीतीत बदल करावेत, जातीयता नष्ट करावी, स्त्रियांना शिक्षण व बरोबरीचे स्थान दयावे, आळशीपणा सोडून उदयोगी बनावे, स्वशासन पद्धती प्रवृत्तीवादी होणे या सर्व मार्गांनी समाजसुधारणा होऊ शकतात हे त्यांनी शिकवले.

·      ९ ऑक्टोबर १८९२ रोजी मृत्यू.

 

 

भाऊ दाजी लाड (इ. स. १८२४ ते १८७४)



·      रामचंद्र विठ्ठल लाड म्हणजेच भाऊ दाजी लाड यांचा जन्म ७ सप्टेंबर १८२४ रोजी गोव्यातील मांजरे येथे झाला.

·      महाराष्ट्रातील एक निष्णात डॉक्टर, विदयापडित, संशोधक व समाजसेवक.

·      पदवीनंतर दोन वर्षे एलफिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये विज्ञानाचे शिक्षक.

·      नोकरी सोडून मुंबईतील ग्रंट मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला.

·      १८५१ मध्ये वैद्यकीय पदवीचे संपादन.

·      अचूक निदान व कुशल शस्त्रक्रिया यामुळे व्यवसायात नावलौकिक.

·      कुष्ठरोगावर एक चांगले औषध शोधून काढल्यामुळे 'धन्वंतरी' म्हणून ओळखले जाते.

·      ज्ञानप्रसारक सभेमार्फत शिक्षण प्रसार व सामाजिक जागृती करण्याचे प्रयत्न केले.

·      स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते. मुलींच्यासाठी आर्थिक झळ सहन करून शाळा सुरू केली.

·      मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेतही त्यांचा पुढाकार.

·      समाजातील अनिष्ट प्रथा, परंपरा नष्ट करण्यासाठी त्यांनी मोहीम उघडली. विधवा विवाहाचा पुरस्कार केला.

·      जगन्नाथ शंकरशेठ यांच्या मदतीने १८५२ मध्ये 'बॉम्बे असोसिएशन' ही संघटना स्थापन केली. (भारतातील राजकीय स्वरूपाची पहिली संघटना)

·      ईस्ट इंडिया असोसिएशनच्या कार्यातही सहभाग.

·      लायसेन्स बिलाचा व्यापार व व्यवसायावर विपरीत परिणाम होईल म्हणून त्याला विरोध केला.

·      इतिहास संशोधनाच्या क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय.

·      सामाजिक व राजकीय समस्या सोडवण्यासाठी संघटनात्मक सनदशीर मार्गांचा पुरस्कार केला.

·      ३१ मे १८७४ रोजी मृत्यू.

 

 

भाऊ महाजन (इ. स. १८१५ ते १८९०)



·      भाऊ महाजन कुंटे यांचा जन्म १८१५ मध्ये कुलाबा जिल्ह्यातील पेण येथे झाला.

·      समाजसुधारणेसाठी सडेतोड व समतोलपणा जोपासणारे विचारवंत.

·      बाळशास्त्री जांभेकरांचे वर्गमित्र.

·      'दर्पण' 'दिग्दर्शन' यात लेखन करत होते.

·      'प्रभाकर' नावाचे साप्ताहिक सुरू केले.

·      'धूमकेतू' 'ज्ञानदर्शन' मधून सामाजिक विषयांवर लेखन केले.

·      सण १८९० मध्ये मृत्यू.




संदर्भ : महाराष्ट्राचा इतिहास - इयत्ता ११ वी.  “जुना अभ्यासक्रम” (मराठी माध्यम)

          Maharashtracha Itihas - standard 11th. “old syllabus” (Marathi Medium)

टिप्पण्या