डॉ. रा. गो. भांडारकर (इ. स. १८३७ ते १९२५)
· रामकृष्ण
गोपाळ भांडारकर यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे ६ जुलै १८३७ रोजी
झाला.
· त्यांचे
आडनाव पत्की असे होते, मात्र
त्यांचे पूर्वज खजिन्यात अधिकारी असल्यामुळे त्यांना भांडारकर असे उपनाव मिळाले.
· मुंबई
विद्यापीठातून एम. ए. ची पदवी तर जर्मन विद्यापीठातून पीएच. डी. त्यांनी मिळवली
होती.
· कर्ते, धर्म व समाजसुधारक, भाषातज्ज्ञ,
प्राचीन इतिहासाचे संशोधक, प्राच्चविदया
संशोधक, संस्कृत भाषेचे पंडित अशा वेगवेगळ्या नात्यांनी
महाराष्ट्र त्यांना ओळखतो.
· प्रार्थना
समाजाच्या स्थापनेत भांडारकरांचा समावेश होता. प्रार्थना समाजाची तत्त्वे, उद्दिष्टे आणि प्रतिज्ञा या तयार
करण्यासाठी त्यांनी फार परिश्रम घेतले.
· हिंदू
धर्मातील मूर्तिपूजा, अवतारकल्पना,
बहुदेवतावाद इ. बाबींना डॉ. भांडारकरांनी विरोध केला.
· वेद, उपनिषदे, भगवद्गीता,
संतवाङ्मय इ. प्राचीन धर्मग्रंथांचा आधार देऊन समाजातील अपप्रवृत्ती
व अनिष्ठरूढी कशा चुकीच्या आहेत ते दाखवून दिले.
· बालविवाह
प्रतिबंध, विधवा पुनर्विवाह संमती, वयाचा कायदा यांसारख्या सामाजिक सुधारणांचा आग्रह धरला, स्त्री शिक्षण अस्पृश्यता निवारण, मद्यपानबंदी,
देवदासी प्रथा बंदी इ. सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला.
· विधवा
विवाहाचा पुरस्कार केला. त्यांनी स्वत:च्या विधवा मुलीचा पुनर्विवाह घडवून आणून
विचाराला कृतीची जोड दिली.
· मुंबई
प्रांताच्या लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे सदस्य, केंद्रीय लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे सदस्य होते.
· ‘अल
हिस्टरी ऑफ डेक्कन’, ‘वैष्णविझम’,
‘शैविझम अँड अदर मायनर’, ‘रिलिजन्स’, ‘हिस्टरी ऑफ इंडिया’ इ. विपुल ग्रंथसंपदा होती.
· इ. स. २४
ऑगस्ट १९२५ रोजी मृत्यू.
बेहरामजी मलबारी (इ. स. १८५३ ते १९१२)
· १८५३
मध्ये गुजरातमधील बडोदा येथे पारशी कुटुंबात जन्म.
· बालविवाह
विरोधी चळवळीचे प्रवर्तक आणि विधवा पुनर्विवाह पद्धतीचे समर्थक, समाजातील दुर्बल घटकांचे कैवारी.
· १८८४
मध्ये बालविवाहाच्या प्रथेला विरोध करणारी टिपणे प्रसिद्ध केली.
· बालविवाहाचे
अनिष्ट परिणाम स्पष्ट करणारे पाठ शालेय अभ्यासक्रमात घ्यावेत, विधवाना पुनर्विवाहाचा हक्क असावा इत्यादी
मागण्या त्यांनी शासनाकडे केल्या.
· ‘इंडियन
स्पेक्टॅटर’ हे साप्ताहिक सुरू केले.
· दादाभाई
नौरोजी यांच्या ‘व्हॉइस ऑफ इंडिया’ या नियतकालिकात ते लेखन करत.
· दयाराम
गिडुमल यांच्या मदतीने ‘सेवासदन’ ही संस्था स्थापन केली.
· गुजराथ
अॅण्ड गुजराथीज, नीती विनोद, बालविवाह व महिलांवर सक्तीने लादण्यात आलेले वैधव्य काही टिपणे इत्यादी
ग्रंथ लिहिले.
· इ. स.
१९१२ मध्ये मृत्यू.
गो. ग. आगरकर (इ. स. १८५६ ते १८९५)
· गोपाळ
गणेश आगरकर यांचा जन्म कराड जवळीला टेंबू येथे इ. स. १४ जुलै १८५६ मध्ये झाला.
· व्यक्तिस्वातंत्र्य
व बुद्धिप्रामाण्याचा पुरस्कार करणारे विचारवंत.
· विष्णुशास्त्री
चिपळूणकर, लोकमान्य टिळक यांच्या मदतीने पुणे येथे ‘न्यू
इंग्लिश स्कूल’ ची स्थापना केली.
· लो.
टिळकांच्या मदतीने 'केसरी'
व ‘मराठा’ ही वृत्तपत्रे सुरू केली. त्यातील केसरीचे संपादन आगरकर
करत होते.
· लो. टिळक
व इतरांच्या समवेत आगरकरांनी ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ ची स्थापना केली. या
संस्थेच्या वतीने ‘फर्ग्युसन कॉलेज’ सुरू करण्यात आले. त्याच कॉलेजचे ते
प्रिन्सिपॉल होते.
· केसरी
सोडून ‘सुधारक’ हे वृत्तपत्र लोकजागृतीसाठी सुरू केले.
· व्यक्तिस्वातंत्र्याचा
आग्रह धरला. व्यक्ती विकासातून समाजाचा विकास होतो असे त्यांचे मत होते.
· बालविवाह, जातिभेद, केशवपन,
धर्माच्या नावावर चाललेल्या गैर प्रकारांना विरोध करून सामाजिक
सुधारणांचा पुरस्कार केला.
· ‘केसरीतील
निवडक निबंध’, ‘सुधारकातील वेचक लेख’,
‘वाक्य मीमांसा’, ‘वाक्याचे पृथक्करण’ इत्यादी
ग्रंथांचे लेखन केले.
· अज्ञान, अंधश्रद्धा, दांभिकता
याला विरोध केला.
· इ. स. १७
जून १८९५ रोजी मृत्यू.
पंडिता रमाबाई (इ. स. १८५८ ते १९२२)
· जन्म
कर्नाटकातील मंगळूर जिल्ह्यातील गंगामुळे या गावी २३ एप्रिल १८५८ रोजी झाला.
· पंडिता
रमाबाई व बंधू श्रीनिवास यांनी कलकत्त्यात आपल्या पांडित्याने व संस्कृत ज्ञानाच्या
आधारे लोकांना थक्क केले. लोकांनी त्यांना ‘सरस्वती’ व ‘पंडिता’ या पदव्या देऊन
गौरवले.
· स्त्रियांच्या
स्थितीबद्दल जागृती करण्यासाठी ‘आर्य महिला समाजाची’ स्थापना १८८२ मध्ये केली.
· हंटर
कमिशनपुढे स्त्री शिक्षणासाठी आग्रह धरला.
· ख्रिश्चन
धर्मातील सेवाभावी वृत्ती व मानवतावादी विचारांमुळे त्यांनी ख्रिश्चन धर्म
स्वीकारला.
· निराश्रित
विधवा व अनाथ स्त्रियांच्या राहण्याची व भोजनाची मोफत व्यवस्था असलेल्या शारदा सदन
ची १८८९ मध्ये मुंबईत स्थापना केली. १८९० मध्ये या संस्थेचे पुण्याला स्थलांतर
करण्यात आले.
· ‘शारदा
सदन’ च्या सल्लागार मंडळात न्या. रानडे, न्या. तेलंग, डॉ. भांडारकर यांसारख्या थोर व्यक्ती
होत्या.
· केडगाव
येथे ‘मुक्तिसदन’ नावाची संस्था सुरू केली. त्यात अनाथ व विधवा स्त्रियांच्या
शिक्षणाची, निवासाची आणि भोजनाची मोफत सोय केली.
· ‘बायबलचे
मराठी भाषांतर’, ‘स्त्रीधर्मनीती’,
‘दि हाय कास्ट हिंदू वुमन’ इत्यादी ग्रंथ उल्लेखनीय आहेत.
· इ. स. ८
एप्रिल १९२२ रोजी मृत्यू.
· महादेव
गोविंद रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे १८ जानेवारी १८४२ रोजी
झाला.
· एकोणिसाव्या
शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील अग्रणी म्हणून न्या.
रानडे यांना मानले जाते.
· कायदयाचा परिपूर्ण अभ्यास. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये इंग्रजी व इतिहास विषयाचे प्राध्यापक झाले. पुढे न्यायाधीश म्हणून पुण्यात आले.
· समाज व्यवस्थेतील
दोष दूर झाल्याशिवाय लोकांत मूल्यांचा विकास होणार नाही असे त्यांचे मत होते.
· राजकारण, अर्थकारण, समाजकारण
आणि धर्मकारण ही समाजाची विविध अंगे असून एकमेकाला पूरक आहेत अशी विचारधारा.
· समाजाची
उन्नती व्हावयाची असेल सदसद्विवेकबुद्धी, समता, न्याय, बंधुभाव या
तत्त्वावर आधारीत समाज रचना होणे गरजेचे आहे असे त्यांचे मत होते.
· प्रार्थना
समाजाच्या स्थापनेत असलेले योगदान, सार्वजनिक सभेतील जवळीक, सामाजिक परिषदेतील योगदान
महत्वपूर्ण होते.
· विधवा
विवाहाचे समर्थन केले आणि त्यातूनच मुंबईत एक विधवा विवाह घडवून आणला.
· हिंदी
राजकारणाला अर्थशास्त्रीय विचारांची जोड दिली.
· समाजकारण, राजकारण, अर्थकारण
क्षेत्रांत न्या. रानडे यांनी आपल्या वैचारिक योगदानाने जागृती घडवण्याचे कार्य
केले.
· इ. स. १६
जानेवारी १९०१ रोजी मृत्यू.
संदर्भ : महाराष्ट्राचा
इतिहास - इयत्ता ११ वी. “जुना अभ्यासक्रम”
(मराठी माध्यम)
Maharashtracha
Itihas - standard 11th. “old syllabus” (Marathi Medium)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा