महाराष्ट्रातील समाजसुधारक भाग - २

 

विष्णुबुवा ब्रम्हचारी (इ. स. १८२५ ते १८७१)



·      विष्णुबुवा ब्रम्हचारी म्हणजे विष्णु भिकाजी गोखले यांचा जन्म कुलाबा (रायगड) जिल्ह्यातील शिरवली येथे १८२५ मध्ये झाला.

·      धर्मग्रंथ व संस्कृत याचे गाढे अभ्यासक.

·      उदात्त मानवतावादी ख्रिश्चन धर्मतत्वाच्या आधारे सुशिक्षित वर्गाला प्रभावित करण्याचे काम केले.

·      ख्रिश्चन धर्मप्रचारकांना उत्तर देण्यासाठी मुंबईत जाहीर व्याख्याने दिली.

·      वैदिक धर्म कसा महान आहे हे लोकांना पटवून द्यायचे काम केले.

·      ‘वर्तमानदीपिका’ या वृत्तपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर दिले.

·      पुनर्विवाह, प्रौढविवाह, घटस्फोट, शुद्धीकरण या विषयी पुरोगामी विचारधारा.

·      ‘भावार्थ सिंधू’, ‘वेदोक्त’, ‘धर्मप्रकाश’, ‘सुखदायक’, ‘राज्यप्ररणी निबंध’, ‘सहजस्थितीचा निबंध’, ‘बोधसागर रहस्य’, ‘सेतुबंधाणी टीका’ इत्यादी ग्रंथ लिहले.

·      इ. स. १८ फेब्रुवारी १८७१ रोजी मृत्यू.

 

 

महात्मा जोतीबा फुले (इ. स. १८२७ ते १८९०)



·      जन्म इ. स. ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला.

·      आधुनिक महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळीचे प्रणेते, एक क्रांतिकारक व कर्त सुधारक म्हणून लौकिक.

·      बहुजन समाजाला हक्कांची जाणीव करून देणारे आणि प्रस्थापितांच्या अन्यायाविरुद्ध लढणारे महामानव.

·      इ. स. १८४८ मध्ये पुणे येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.

·      इ. स. १८५२ मध्ये दलितांना शिक्षण देण्यासाठी पहिली शाळा सुरू केली.

·      विधवा पुनर्विवाहास चालना दिली आणि इ. स. १८६४ मध्ये पुण्यात एक पुनर्विवाह घडवून आणला.

·      विधवा स्त्रियांच्या मुलांना दत्तक घेऊन समाजक्रांतीस चालना दिली.

·      स्वतःच्या घरी बालहत्या प्रतिबंधगृहाची स्थापना केली.

·       अस्पृश्यता हा मानवजातीला कलंक आहे अशी विचारधारा आणि त्यातूनच स्वताच्या घरातील पिण्याच्या पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.

शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य :

·      शेतकरी व बहुजन समाजात परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता शिक्षणात आहे हे पटवून दिले.

·      ‘शेतकऱ्यांचा आसूड’ या ग्रंथात त्यांनी शेतकऱ्यांचे विदारक चित्र रेखाटले.

·      शेतकऱ्यांची व बहुजणांची परिस्थिति बदल व्हावी म्हणून शिक्षण, वसतीगृह, सिंचन, धरणे, तलाव, विहिरी यांच्यासारखे अनेक उपाय सुचवले.

·      इ. स. १८८८ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या चिरंजीवांच्या कार्यक्रमामध्ये ‘शेतकऱ्यांचे प्रतिनिधि’ म्हणून पारंपरिक पोषाखात उपस्थित राहून शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे मांडले.

·      हंटर कमिशन पुढे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे अशी आग्रही मागणी केली.

·      इ. स. २८ नोव्हेंबर १८९० रोजी मृत्यू.

 

 

सावित्रीबाई फुले (इ. स. १८३१ ते १८९७)



·      जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्हयातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला.

·      महात्मा फुलेंनी सुरू केलेल्या मुलींच्या शाळेत सावित्रीबाईंनी शिक्षिका म्हणून कार्य केले आणि पहिल्या स्त्री शिक्षिका होण्याचा मान मिळवला.

·      अस्पृश्योद्धाराच्या कार्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता.

·      बालहत्या प्रतिबंधगृहातील अनाथ मुलांचे संगोपन केले. त्या अनाथ मुलांच्या 'माउली' होत्या.

·      प्लेगच्या रोग्यांची शुश्रूषा करताना प्लेगची बाधा झाल्यामुळे इ. स. १० मार्च १८९७ रोजी मृत्यू.

 

 

बाबा पदमनजी (इ. स. १८३१ ते १९०६ )



·      बाबा पदमनजी मुळे यांचा जन्म बेळगाव येथे १८३१ मध्ये झाला.

·      त्यांचा जवाहिरांचा व्यापार होता.

·      प्रारंभिक शिक्षण बेळगावातील मिशनरी स्कूल मध्ये आणि नंतर मुंबई येथील विल्सन फ्री चर्च स्कूलमध्ये शिक्षण घेतले.

·      इंग्रजी, मराठी, संस्कृत, कन्नड, गुजराती अशा भाषांचा अभ्यास केला.

·      ख्रिस्ती धर्मातील मानवतावादामुळे ते ख्रिस्ती धर्माकडे आकृष्ट झाले. परिणामी १८५४ मध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला.

·      फ्री चर्चच्या शाळेत शिक्षकाची नोकरी केली.

·      बायबल आणि ट्रस्ट सोसायटीच्या संपादकाचे काम.

·      मूर्तिपूजा व जातिभेदास विरोध.

·      परमहंस सभेचे सक्रिय सदस्य.( पुढे जाऊन सभेशी संबंध तोडले)

·      विधवा पुनर्विवाहाचे ते पुरस्कर्ते होते. त्यांनी 'यमुना पर्यटन' या कादंबरीतून स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडली.

·      समाजातील अपप्रवृत्ती दूर व्हाव्यात हाच त्यांचा हेतू.

·      'अरुणोदय' हे आत्मचरित्र.

·      इंग्रजी-मराठी व संस्कृत-मराठी असे शब्दकोश लिहिले.

·      शंभराहून अधिक ग्रंथांचे लेखन केले.

·      इ. स. १९०६ मध्ये मृत्यू.

 

 

विष्णुशास्त्री पंडित (इ. स. १८२७ ते १८७६)



·      जन्म इ. स. १८२७ मध्ये सातारा जिल्ह्यातील बावधन येथे झाला.

·      स्त्रियांच्या उद्धारासाठी ज्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले अशा समाजसुधारकांत विष्णुशास्त्री पंडित हे अग्रणी होते.

·      'इंदुप्रकाश' या साप्ताहिकाचे ते संपादक होते. या वृत्तपत्रातून त्यांनी आपली सुधारणावादी मते निर्भीडपणे मांडली.

·      स्त्री शिक्षण, विधवा स्त्रियांचे प्रश्न, केशवपन, परदेशगमन, जरठविवाह, जातिभेद इत्यादी प्रश्नांवर त्यांनी आपले सडेतोड विचार मांडले.

·      'पुनर्विवाह उत्तेजक मंडळी' या सभेची स्थापना केली. या सभेमार्फत विधवांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य केले.

·      ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या 'विधवा विवाह' या ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला.

·      आपल्या विचारांवरील निष्ठा एका विधवेशी विवाह करून प्रत्यक्ष कृतीने सिद्ध केली.

·      बालविवाह पद्धतीला विरोध केला.

·      ब्राम्हण कन्या विवाह, विचार पुरुष सुक्त व्याख्या, विधवा विवाह, हिंदुस्थानाचा इतिहास, तुकाराम बाबांच्या अभंगाची गाथा, संस्कृत व धातुकोश, इंग्रजी व मराठी कोश हे त्यांचे निवडक ग्रंथ आहेत.

·      मृत्यू इ. स. १८७६ मध्ये झाला.

 

 

सार्वजनिक काका (इ. स. १८२८ ते १८८०)




·      वासुदेव गणेश जोशी म्हणजेच सार्वजनिक काका यांचा जन्म ९ एप्रिल १८२८ रोजी साताऱ्यात झाला.

·      सार्वजनिक सभेचे मुख्य संस्थापक आणि आधारस्तंभ.

·      वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र सरकारच्या दबावामुळे कोणीही घेत नव्हते, मात्र मोठ्या उमेदीने व्यवसायाने वकील असलेल्या सार्वजनिक काकांनी ते घेतले.

·      आँधचे श्रीमंत श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली १८७० मध्ये सार्वजनिक सभेची स्थापना झाली. (राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी पुणे येथे सनदशीर मार्गाने कार्य करणारी सभा)

·      न्या. रानडे व सार्वजनिक काका यांनी सार्वजनिक सभेला सामाजिक व राजकीय स्वरूप दिले.

·      ब्रिटिश सम्राज्ञीकडे भारतीयांना सामाजिक व राजकीय दर्जा द्यावा, स्वावलंबी बनवणारे शिक्षण दयावे, राजकीय हक्क दयावे अशी मागणी केली.

·      वृत्तपत्र स्वातंत्र्याचे ते पुरस्कर्ते.

·      देशाच्या उन्नतीसाठी लघुउद्योगाचा आग्रह त्यांनी धरला. स्वदेशीचा पुरस्कार केला. स्वदेशी मालाची दुकाने काढली.

·      सार्वजनिक काकांनी सार्वजनिक सभेमार्फत १८७६-७७ मधील महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त लोकांना भरीव मदत दिली.

·      रेल्वे उतारूंचे प्रश्न, संस्थानिकांचे अधिकार राज्यातील देंगे याबाबत त्यांनी सरकारला सल्ले देऊन लोकहिताचे कार्य केले.

·      इ. स. २५ जुलै १८८० रोजी मृत्यू.




संदर्भ : महाराष्ट्राचा इतिहास - इयत्ता ११ वी.  “जुना अभ्यासक्रम” (मराठी माध्यम)

          Maharashtracha Itihas - standard 11th. “old syllabus” (Marathi Medium)

टिप्पण्या